मुख्य सामग्रीवर वगळा

chapter 1- दिवस २

जर तुम्हाला पडणारे प्रश्न काही असे असतील किंवा काही असे प्रश्न कि ज्यांची उत्तरे तुम्हांस  माहित नाहीत
व जाणून घेण्याची तुमची इच्छा आहे असेच काही प्रश्न खालीलप्रमाणे :


  1. जीवनाचे नेमके कारण काय ?
  2. आपण जन्माला का येतो ?
  3. जीवनानंतर नेमके काय ?
  4. मरणानंतर जीवन कसे असते ?
  5. जर जीवन सुखी किंवा असमाधानी असेल तर मरणानंतर ते कसे असेल ?
  6. आपली इच्छाशक्ती मरणोत्तर जिवंत असते का ?
  7. स्वर्ग अन नर्क म्हणजे नक्की काय ?
  8. आपण नेमके कोठे जातो ?
  9. जीवन शरीराचा त्याग केल्यावर संपते कि नक्की खर्या अर्थाने सुरु होते ?
  10. नक्की असमाधान किंवा उलाढाली अथवा उलाथापालात एखाद्याच्या जीवनात नक्की का होतात ?
  11. कर्म म्हणजे नक्की काय ?
  12. आपले मलिक कोण आहे ?
  13. आपण कोणाच्या इशार्यावर चालतो कि आपण आपल्या कर्माने आपले जीवन घडवत असतो ?
  14. सुखी अन आनंदी जीवन असून देखील दुख का येते ?
  15. आत्मा हा निराकार आहे असे म्हणतात मग आपले रुपांतर मरणानंतर एखाद्या भूत पिशाच्यात होते का ?
  16. मोक्ष्य अथवा मुक्ती कशी मिळवावी जीवन अन मृत्युच्या ह्या वर्तुळातून 
  17. नक्की कोणता प्रवास सुरु होतो आपला हे शरीर त्यागल्यानंतर 
  18. माझा आत्मा कोणाचे वेगळे शरीर धारण करून जन्माला येईल का ?
  19. मरणोत्तर विधी जर पूर्ण केल्या नाहीत तर माझा मार्ग सुखकर असेल का ? का तरीही मी या भूतलावर अवलंबून असेन ?
  20. शाररीक अपंगत्व अथवा आपल्या वागण्यामुळे बदललेले हे आत्म्याचे स्वरूप नक्की स्वच्छ प्रतिमेचे होईल का ? अग्नीत विसर्जन झाल्यावर ?
  21. मरण का अटल आहे ? 
  22. आपणास कोणी पाहत नसते तेंव्हा आपण जे वागतो त्यास आपले चारित्र्य समजले जाते मग आपण जे वागलो त्यामुळे आपला मार्ग बदलेल का ?
  23. मरणानंतर आपण झालेल्या चुका सुधारू शकतो का ?
  24. जसे सध्या जीवनात कायदे असतात , मरणानंतर देखील आपण कायद्याच्या बंधनात असतो का ?

असे बरेच प्रश्न अन बरीच उत्तरे तुम्हास पहावयास मिळतील . 
आपला प्रवास संपत नसतो ? कर्म करत राहावे  पण नक्की कोणत्या कामास न्याय देण्यास आपण या भूतलावर जन्म घेतला आहे हे आपणांस माहित आहे का ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

chapter 1- दिवस ४ संक्षिप्त माहिती

गरुडा म्हणतात सर्व लोक मनाहाजे जग फिरून आल्यावर मला समजले कि पृथ्वी खूप लोकवस्तीने भरलेली आहे अन तिथे वेदिक जीवन जगणे अन उत्तम रीतीने जीवनाचा अनुभव घेणे खूप रमणीय आहे , तिथे खूपशा संध्या उपलब्ध असून देवाने सर्व काही दिले आहे कि ज्याने करून माणसाचे मनोरंजन होईल ,म्हणूनच मला वाटले कि पृथ्विलोक हे सर्वात उत्तम आहे सर्व लोक मध्ये . पण तसेच तेथील जीवन खूप भयावह अन अचंभित करणारे वाटते तसेच नश्वर अन कधीही संपणारे वाटते अन मला त्याविषयी खंत वाटते .पृथ्विलोकात भ्रमण करताना मी अचंभित झालो कि जेंव्हा मी पहिले कि एखादा व्यक्ती जीव त्यागतो तेंव्हा सर्व जन शिस्तीमध्ये उभे राहून सर्व विधी करत असतात पण हे नेमके विधी म्हणजे आहेत का अन हे या पृथ्वी तलावरच का ? अन मारानानंतरच का करतात ? माझ्या समोर बरेच असे प्रश्न आहेत कि ज्यांची उत्तरे मला माहित नाहीत . मला काहीच समजले नाही कि का मृत व्यक्तीला लाकडांच्या वर झोपवले जाते अन अग्नी ने दाह का केला जातो , विविध दान का केली जातात अन सर्व जन दुखात का असतात ,मला काहीच समाजात नाही माणूस मारतो म्हणजे नेमके नक्की काय होते अन तो मरणानंतर नक्की जातो कुठे अन ...

chapter 1- दिवस ३ माहिती आणि महत्व

सदर खंड हा गरुड पुराना जे विष्णू पुराना खंडाचा एक अविभाज्य   भाग आहे त्यापासून प्रेरणा घेऊन    लिहिला गेला आहे . सदर खंड व त्याचे स्वरूप हे पक्ष्याचा राजा     गरुड अन विश्व निर्माता देवता भगवान विष्णू यांच्यामधील संभाषण यामध्ये अधिलिखित केले    आहे.   सदर खंडात बरेच अशी उपजत माहित नसनारी रहस्य लिहिली गेली असून त्याचा संबंध मृत्यू , पुन्हा जीवन , अंन     मृत्यू नंतर जीवन तसेच मृत्यू नंतरच्या विविध विधी  याविषयी लिहिली गेली आहेत .   तसेच मानवी शरीर त्यागाल्यानंतर आत्मा अन त्याचा पुढचा प्रवास याविषयी आहे ऽअपल्य हिंदू संस्कृती मध्ये बर्याच ठिकाणी गरुड पुराना वचने हे योग्य मानत    नाहीत व लोकांमध्ये याचे बरेच भय आहे .   असे बरेच ग्रंथ तुम्हाला वाचण्यास मिळतील ज्यात जीवन , परत जीवन अन मृत्युनंतरचे जीवन व आत्म्याचा प्रवास याविषयी लिहिले गेले आहे , तसेच स्वर्ग नर्क अन म्र्य्त्युच्य देवतेविषयी अन त्याच्या राज्याविषयी बरेच आहे . , आपल्या संस्कृतीत य मा हा मृत्यूचा राजा आहे अन तो यम लोकात राहतो अन चौकोनी अस...

chapter 1- दिवस १

गरुड पुराना  एक असा ग्रंथ अथवा व्याख्या म्हणा जो आजवर  आपणास केवळ नावानिशी ठाऊक आहे  परंतु समजण्यास अथवा समजून सांगणारे कमीच , बरेच लेख प्रसिद्ध  आहेत पण केवळ आहेतच  वाचक फार कमी असे का ? कारण आहे आपण ते समजून घेतलेच नाही कधी व आपल्याला ते सांगणारेच नव्हते , जीवन एक सत्य आहे अन  मृत्यू हे सुंदर गूढ , स्वर्ग  अन नर्क  असे काही प्रकार जे आपल्या पाप अन पुण्याच्या घड्यावर साध्य ! बर्याच भाकट  कथा  अन बरीच न समजणारी अन उमगणारी भाष्य अन आपण असह्य । जीवनाचा खेळ हा असाच उत्तम रीतीने सुरु असतो अन कोणीतरी अचानक येउन सुचवतो , या जीवनानंतर पुढे काय , तर खेळ सुरु होतो आपल्या मृत्यू नंतरच्या प्रवासाचा , असाच हा प्रवास आज पासून सुरु होत आहे त्यात मी तुम्हाला जसे मी समजलो त्याच पद्धतीने काही पुराणांची माहिती देत आहे । सदर खंड हा कोणालाही दुखावण्याच्या हेतूने लिहिला जात नसून तो नक्की हे सर्व आहे काय  या जीज्ञासाने अन सर्वांना समजावे असे लिहिण्याचा हा प्रयत्न सदर पुराना मराठीत लिहिण्याचा उद्देश इतकाच कि , या पुर...